Ad will apear here
Next
रिच मदर रिच सन
मुल गरिबीत जन्माला आले, तरी त्याने मोठेपणी चांगले पैसे कमवावे, असे प्रत्येक पालकांना वाटत असते. त्यासाठीची तयारी बालपणापासून करणे कसे आवश्यक आहे, हे प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘रिच मदर रिच सन’मधून शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्या माध्यमातून सांगितले आहे.

यात जिजाऊमाता यांनी शिवरायांना मनुष्याचे विविध प्रकार, छत्रपती होण्यासाठीचे आठ गुण, आयुष्यात उच्च ध्येय ठेवणे, वेळ व संधीचा सुयोग्य वापर, गुंतवणुकीची सवय, सतत शिकण्याची वृत्ती, योग्य मित्रांची निवड, स्वयंशिस्त यावर मार्गदर्शन केले आहे. शिकूनही श्रीमंत न होण्याची कारणे, शून्यातून श्रीमंतीकडे जाण्याच्या महामार्ग, श्रीमंतीची खरी व्याख्या, आयुष्यभर नोकरी करत राहिल्याने गरीब राहणे, श्रीमंती व विद्वत्तेचा संबंध, प्रगतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची धमक, पैशांच्या क्रयशक्तीचा आणि पैशाची उपयुक्तता जाणून घेणे, पांढरे हत्ती पोसण्याचे तोटे, श्रीमंत होण्यासाठी जोखीम उचलण्याचे धैर्य, श्रीमंत होण्याची मानसिकता आदी प्रकारणांमधून श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग यातून दाखविला आहे.     

प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : १७२   
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZWHBS
Similar Posts
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा
एक संन्यासी शिवाजी महाराजांचे चरित्र वेगवेगळ्या अंगाने अभ्यासता येते. दर वेळी त्यातून काही नवे होती लागते. निष्काम कर्मयोग हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. याची ओळख प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. लाखो लोकांचा संसार करणारे ते संन्यासी होते, असे जाधव सांगतात. महाराजांनी संपत्ती
श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू श्रीकृष्णाच्या चातुर्यापासून ते त्याच्या महान तत्त्वज्ञानापर्यंत अनेक गुणांची आपल्याला ओळख आहे; मात्र तो एक कुशल व्यवस्थापक होता, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘श्रीकृष्ण एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मुलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे कुशलव्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व
गनिमी कावा शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language